बुधवार, १३ मे, २०२०

निमित्त.... विधान परिषद निवडणुकीचे...


खरे तर 'मोहन' च्या बासरीत खुप ताकद असते. पण 'पुण्य' नगरीतील या मोहनने मागच्या वर्षी मे महिन्यात झालेल्या 'महायुद्धात' 'मैत्री' धर्म पाळताना 'सुदामा'ला अगदी सहजच 'राजसत्ता' बहाल केली. 'सुदामाने' दिलेल्या 'प्रसादा'ची लाज राखली. असे करतांना या मोहनने साक्षात 'दिल्लीचे'

'युवराज' पुण्यनगगरीत आले असतांना प्रचारात सहभागी होण्यास नकार दिला होता असे म्हटले जाते. यांच्या मैत्री धर्माची चर्चा अगदी दिल्लीत ही पोहोचली होती. म्हणूनच या 'मरहट्ट' राज्यातील वरिष्ठांच्या सभागृहात जाण्यासाठी इच्छूक असलेल्या मातब्बर सरदारांच्या यादीत यांचेही नाव अग्रस्थानी होते. असे सांगितले जाते की, ही इच्छूकांची यादी समोर आली तेव्हा युवराजांनी प्रश्न विचारला की हेच का ते ज्यांनी माझ्यासोबत प्रचाराला नकार दिला होता? आणि तिथेच त्यांच्या नावावर फुली मारली गेली असे सांगितले जाते.

एक ते 'साहेब' होते, ज्यांनी पाठीवर आशिर्वादाचा हात ठेवला तर सामान्यातला सामान्य माणूसदेखील - मग तो चपराशी असो, भाजीविक्या असो की भिक्षुकी करणारा ब्राम्हण - राजसत्तेची फळे चाखत असे.

या मोहनने आटपाट 'नगरातील' एका 'साहेबाला' हाताशी धरून खूप प्रयत्न केले. गरज पडलीच तर याच नगरातील कोण्या परिचिताकडून 'मालपाणी'ची व्यवस्था करून ठेवली. पण 'सोनिया'चे दिवस येण्यासाठी केवळ निष्ठा असून चालत नाही, तर प्रामाणिकपणा पाहिजेच. जिथे 'अस्सल' ची गरज असते, तिघे 'तांबे' उपयोगाचे नाही आणि ८० च्या दशकातही 'राजीव'करिश्मा होता आणि यापुढेही 'राजीव' च्या शब्दाला वजन असेल, हा धडा या निवडणुकीच्या निमित्ताने मिळाला आहे.

©विवेक भावसार
१३.५.२०२०